MLA Sanjay Shinde appeals to the authorities to coordinate and work on the work of common citizens

करमाळा (अशोक मुरूमकर) : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत आणि कोणाचीही अडवणूक होऊ नये म्हणून योग्य तो समनव्य ठेवून आवश्यक ती काळजी घेत वेळेत कामे करण्यावर भर द्या, असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले आहे. यावर्षी पाऊस चांगला पडला असून नागरिकांना अर्थपुरवठा (पीक कर्ज व इतर कर्ज) करण्यासाठी सहकार्याची भावना ठेवा, अशी सूचनाही बँकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी केली आहे.

आमदार शिंदे यांनी आज (मंगळवारी) करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागातील प्रशासकीय कामाचा आढावा घेतला. तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री. गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक श्री. चंदनशिवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत, आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले आदी उपस्थित होते.

तहसीलदार ठोकडे यांनी करमाळा तालुक्यात कुणबी दाखले वितरणात वेगाने काम सुरु असल्याचे सांगितले. याशिवाय रस्ता केसची प्रकरणी निकाली लावली असून सध्या पावसामुळे स्थळ पहाणी करण्यात अडचणी येत आहेत. मात्र अशाही स्थितीत कोणाचीही अडवणूक होणार नाही याची खबरदारी घेतली असल्याचे सांगितले. तालुक्यातील घरकुलासाठी यादी मिळाल्यानंतर जप्त केलेली वाळू उपलब्ध करून दिली जाईल, असेही तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले आहे. याबाबत ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने नुकतेच एक वृत्त प्रसिद्ध केले होते.

गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, करमाळा तालुक्यात घरकुलाचे कामे वेगाने सुरु आहेत. पाणी त्यांचामुळे काही ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी अडचण होती. सध्या रमाई घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. घरकुल बांधकामासाठी ‘डस’हा वाळूला पर्याय आहे. मात्र वाळूसाठी महसूल विभागाकडे लाभार्थ्यांची यादी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांच्याशी संबंधित विभागाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उउपाभियंता गायकवाड यांनी त्यांच्या विभागाकडून सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यावर आमचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी अधिकारी वाकडे म्हणाले, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. आणखी जादा पाऊस झाला तर पेरणीची पद्धत बदलेले. पीक बदल करण्यावर भर दिला जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. जादा दराने खत व बियाणे विक्रीची तक्रार आमच्याकडे आलेली आहे. मात्र ‘एमआरपी’च्या पुढे विक्री होत नसेल तर त्यात कारवाई करता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट पणे सांगितले आहे. ‘उमेद’चे जगताप यांनीही तालुक्यातील बचत गटाची स्थिती सांगितले. गावागावात कार्यरत असलेल्या ग्रामसंघाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकध्यक्ष संतोष वारे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर, भोसे येथील भोजराज सुरवसे, श्री. जगदाळे आदींनी यावेळी समस्या मांडल्या.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *