सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. यामध्ये सोलापूर व नगर जिल्ह्याची जबाबदारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देण्यात आली आहे.
जिल्हानिहाय पालकमंत्री : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगर व सोलापूर, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर व गोंदिया, चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे, विजयकुमार गावित यांच्याकडे नंदुरबार, गिरीश महाजन यांच्याकडे धुळे, लातूर व नांदेड, गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व बुलढाणा, दादा भुसे यांच्याकडे नाशिक, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ व वाशिम, सुरेश खाडे यांच्याकडे सांगली, संदिपान भुमरे यांच्याकडे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर),
उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी व रायगड, प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे परभणी व उस्मानाबाद (धाराशिव), रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर व सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोली, दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर व कोल्हापूर, अतुल सावे यांच्याकडे जालना व बीड, शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा व ठाणे व मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगर अशी जबाबदारी देण्यात आली आहे.