-

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी ओढे वाहिले आहेत. तलावातही पाणी साचले असून काही विहिरी व बोअरला पाणी आले आहे. याचा परिणाम शेतीवर झाला असून गावागावांमध्ये सुरु झालेल्या टँकरवर देखील झाला आहे. तालुक्यात सुरु असलेल्या टँकरपैकी २६ गावातील टँकर बंद झाले आहेत.

करमाळा तालुक्यात यावर्षी नागरिकांना तीव्रपणे टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. तालुक्यातील ४६ गावांमध्ये टँकरने पाणी सुरु होता. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाला असल्याने २६ गावातील टँकर बंद केले आहेत. तालुक्यात वर्षभर पडणाऱ्या पावसाच्या सरासरींपैकी साधणार 60 टक्के पाऊस झाला असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिली आहे.

तालुक्यात पावसाळ्यात ४०० मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. पावसाळ्यात (जून, जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर) हा पाऊस पडत असतो. गेल्यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हते. उजनी धरण १०० टक्के भरले नव्हते. सीना नदीलाही पाणी नव्हते. मांगी तलाव भरलेला नव्हता. याचा परिणाम शेतीसह सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर झाला होता. उन्ह्याळात ४६ गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. पाऊस वेळेवर पडल्याने टँकर बंद करावे लागले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *