करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथे शेतीला वीज पुरवठा करणारा एकच डीपी (ट्रान्स्फार्मर) २० दिवसात चार वेळा जळाला आहे. याकडे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गांभीर्याने पहात नसल्याचा आरोप करत आज (गुरुवारी) संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामध्ये जनावरांच्या पाण्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बिटरगाव श्री येथील शेतील वीज पुरवठा करणारा डीपी जळाल्याबाबत १ फेब्रुवारीला अधिकृत अहवाल गेला आहे. त्यापूर्वी सात दिवस डीपी जळालेला होता. अहवाल गेल्यानंतर बार्शीत १०० केव्हीचा डीपी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत सहा दिवस गेले. दरम्यान ६ तारखेला करमाळ्यात देवळाली येथे डीपी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शेतकरी स्वखर्चाने डीपी घेण्यासाठी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डीपी मिळाला. हा डीपी जोडल्यानंतर त्याच दिवशी तो नादुरुस्त असल्याचे समोर आले. हा डीपी जोडल्यानंतर संपूर्ण फिटर बंद पडत होता. त्याची माहिती अधिकाऱ्यांना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे (शनिवारी (ता. ८) देवळालीतील संबंधित ठेकेदाराने डीपी बदलून दिला. त्याचे गाडी भाडे शेतकऱ्यांनी वर्गणी करून दिले.

उन्हाळा सुरु झाला असल्याने हिरव्यागार पिकांना पाण्याची गरज असताना तो डीपी चार्ज करण्यासाठी ठराविक वेळेपर्यंत ठेवण्यात आला होता. बिघाड नको म्हणून वस्त्या देखील शेतकऱ्यांनी अंधारात ठेवल्या. संबंधित ठेकेदाराने सांगितल्यानुसार डीपीची आरतींग देखील व्यवस्थित करण्यात आली. त्यानंतर वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल झाला होता. त्यानंतर पुन्हा (मंगळवारी ता. ११) डीपी सुरु करण्यात आला. मात्र तोही लगेच जळाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर बुधवारी (ता. १२) दुसरा डीपी बसवला. मात्र तो डीपी जोडल्यानंतर पुन्हा संपूर्ण फिडर बंद पडू लागला. त्यामुळे या भागातील इतर शेतकऱ्यांना देखील वीज मिळाली नाही. या प्रकाराबाबत अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा संशय आहे. संबंधित ठेकेदाराची चौकशी करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे कुशल मन्युष्य बळ आहे की नाही हे समोर येणे आवश्यक आहे.

वीज वितरण कंपनीच्या या कामामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या ऊसाच्या लागवडी सुरु आहेत. गहू पाण्याला आले आहेत. मात्र २० दिवसांपासून या भागात डीपी मुळे शेतकऱ्यांचे वीज पंप बंद आहेत. जनावरांना देखील पाणी नाही. या मध्ये काय बिघाड आहे याची तपासणी करून शेतकऱ्यांना त्वरित सुरळीत वीज द्यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनावर भूषण अभिमन्यू, अशोक मुरूमकर, अतुल मुरूमकर, भाऊसाहेब मुरूमकर, संजय जाधव, दिलीप मुरूमकर, शिवाजी मुरूमकर आदींच्या सह्या आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *