करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी हे कोणाशीही समानव्य ठेवत नसल्याचा आरोप इच्छुक उमेदवारांचा आहे. नाव न छापण्याच्या अटीवर अनेक नागरिकांनी त्यांच्याबाबत माहिती दिली आहे. आज (समोवार) तर त्यांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक कक्षातच दरवाजा वाजवून त्यांचे लक्ष वेधले. मात्र बाहेर याबाबत उलटसुलट चर्चा असून निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्यात बदल होईल का नाही हा प्रश्न करमाळकरांना पडला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी कोणाला संपर्क साधायचा हाही प्रश्न आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पारगे हे पत्रकारांशी संवाद साधत नाहीत. त्यामुळे नेमके खरं काय झाले हे समजने कठीण असून या प्रकराबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. इच्छुक उमेदवारांची शेवटपर्यंत धावपळ झाल्याचे दिसले. बरोबर ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी पारगे यांनी दरवाजा बंद करण्याची सूचना दिली. तेव्हा निवडणूक कक्षात संबंधित उमेदवार, त्यांचे सूचक व इतर संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. पारगे यांनी दोन्ही मुख्य दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस बांधव व कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद केला. मात्र काही वेळात आतील काही नागरिकांचे काम झाले. त्यामुळे ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान त्यांनी बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र सर्वांचे काम झाल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही, असे म्हणत निवडणूक पारगे यांनी दरवाजा उघडण्यासाठी विरोध केला. त्यानंतर तेथील काही व्यक्ती संतप्त झाल्या. ‘आतमध्ये स्वच्छतागृह नाही, पाणी नाही, असे असताना आमचे काम झाले आहे मग बाहेर जाऊद्या अशी विनवणी त्यांनी केली. मात्र तरीही पारगे यांनी दरवाजा उघडण्यास विरोध केल्याने’ त्यांनी दरवाजा वाजवला सुरुवात केली. त्याचा आवाज आणि मोठ्या आवाजात बोलले बाहेरही ऐकायला येऊ लागले. त्यामुळे बाहेर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस बांधव आणि नागरिक हे देखील घाबरले. कारण आतमध्ये काय झाले हे बाहेर काहीच समजत नव्हते. त्यानंतर काही वेळातच दरवाजा उघडण्यात आला तेव्हा बाहेर पडलेल्या नागरिकांनी पारगे यांच्या भूमिकेला विरोध केला.
पारगे हे नागरिकांशी समन्वय ठेवत नाहीत, असा यापूर्वीही आरोप झालेला आहे. आज त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे निवडणूक कक्षातच गोंधळ झाला आहे. त्यांच्यात नियमात राहूनच सुधारणा होणे आवश्यक आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. अर्जांची छाननी आणि माघार घेतेवेळी तरी त्यांनी योग्य नियोजन करावे किंवा कक्षात स्वच्छतागृह आणि महिलांसाठी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा आहे.
