करमाळा (सोलापूर) : ‘जून्या लोकांनी उभारलेल्या संस्थेस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी निवडणुक लढवित असुन मतदार आम्हाला विजयी करतील’, असा विश्वास आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला.
वांगी नं ३ येथे श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनलची प्रचार सभा झाली. आमदार पाटील म्हणाले, ‘सभासदांनी स्वतःचा मालकी हक्क टिकवून ठेवण्यासाठी ही निवडणुक हाती घ्यावी. उजनी परिसरातील वीज, पाणी व रस्ते याबाबतीत माझे लक्ष आहे. या भागातील शेतकऱ्यांना शेतीपुरक मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या पदावर असो त्या पदावरुन न्याय दिल्याने सभासद मतदार आमच्या पॅनलला विश्वासाने मतदान करतील,’ असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आदिनाथ कारखान्यास गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सभासदांनी आमच्या पाठीशी उभे रहावे. हा कारखाना माझ्यासाठी महत्वाचा आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभारणीत गोविंदबापू पाटील यांच्यासह इतर ज्येष्ठ मंडळींचा मोठा सहभाग आहे. गोविंदबापूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला हा कारखाना ताब्यात हवा आहे. त्यासाठी कोणत्याही संकटात जाण्याची माझी तयारी आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी दोनवेळा आमदार झालो आहे. माझ्या काळात मी अनेक विकासकामे केली आहेत. पूर्व व पश्चिम भागात मी रस्त्याचे काम केले आहे.’