विरोधासाठी विरोध करणारा मी नाही, दहिगाव योजनेचे पाईप आमच्या कार्यकर्त्यांनी जाळले असतील तर पुरावे द्या : आमदार पाटील

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाईप आमच्या कार्यकर्त्यांनी जळलेले नाहीत. बंदनलिकेला शेतकऱ्यांच्याच विरोध आहे. हे फक्त स्वार्थासाठी काम केले असल्याचा आरोप’, आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर केला आहे.

दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंदनलिका कामाचे पाईप पाच महिन्यात दोनदा जाळल्याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून पाटील व शिंदे गटात जुंपली आहे. दरम्यान माध्यमांनी आमदार पाटील यांना याबाबत प्रश्न केला होता. त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार पाटील म्हणाले, ‘विरोधासाठी विरोध करणारा मी नाही. दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाईप आमच्या कार्यकर्त्यांनी जाळले असतील आणि कोणी त्याला पाहिले असेल तर त्याचे पुरावे द्यावेत, मी त्याला तुडवायलाही तयार आहे. बंदनलिका कामाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे कामच ‘त्यांनी’ घेतले आहे. कोणाची मागणी नसताना त्यांनी हे काम सुरु केले, असे माजी आमदार शिंदे यांचा उल्लेख न करता आमदार पाटील म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘बंदनलिकेचा कसा तोटा आहे हे मी सांगतो. या कामामुळे प्रकुलेशन होत नाही. परिसरातील ओढे, विहीर व बोअरला पाणी येत नाही. त्यामुळे त्या कामाला विरोध आहे. परिसरातील गावांचाही त्याला विरोध असून नागरिकांना हे काम मान्य नाही. आमचा पाईप जाळले याचा काहीही संबंध नाही, असे प्रत्युत्तर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपाला आमदार नारायण पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *