बीड : बीड येथील इशारा सभेत आज (शनिवार) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुढील निर्णय जाहीर केला आहे. २० जानेवारी २०२४ पासून मुंबईत ते आमरण उपोषण करणार आहेत. मुंबईला आंदोलनासाठी ते अंतरवली सराटी येथून चालत जाणार आहेत. हे आंदोलन शांततेत करावे, असे आवाहन जरांगे यांनी समाज बांधवाना केले आहे. मराठा आरक्षणासाठी हा शेवटचा लढा असेल असेही त्यांनी जाहीर केले आहे. मनोज जरांगे हे आंदोलन करणार असून समाज बांधव त्यांना भेटण्यासाठी येतील. एखादा समाज बांधवानी आरक्षणासाठी घर सोडले तर ते आरक्षण घेऊनच येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा केला निर्णय जाहीर, आंदोलनाची तारीख जाहीर
