सोलापुरातील शांतता रॅलीसाठी करमाळ्यातून मराठा समाज बांधव रवाना

Maratha community members leave from Karmala for peace rally in Solapur

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज (सोलापूर) येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी करमाळा येथून अनेक समाजबांधव रवाना झाले आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातून स्वखर्चाने गाड्या घेऊन समाजबांधव सोलापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातून दुसऱ्या टप्यातील रॅलीचा आज शुभारंभ होत आहे. मराठा बांधव मोठ्याप्रमाणात येथे येणार आहेत. तालुक्यात व जिल्ह्यात यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजन करण्यात आले. या रॅलीसाठी करमाळा येथील सकल मुस्लिम समाज बांधवानी व भीमदलने पाठींबा दिला आहे. करमाळा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून समाज बांधव रवाना झाले आहेत. सोलापुरात श्री छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान ही रॅली होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *