करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे करमाळा तालुक्यातील सर्वच विविध कार्यकारी सहकारी संस्था (सोसायट्या) यांच्या मार्फत होणारे पीक कर्ज वाटप चार महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे. यामुळे उजनी धरण ११० टक्के पूर्ण भरलेले असूनसुद्धा शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी खाजगी बँका, सावकार यांच्याकडून कर्ज घेत आहेत. सध्या तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन, संचालक यांची अवस्था कर्जवाटप बंद असल्याने फक्त नामधारी अशी झाली आहे. विविध कार्यकारी सोसायटी मार्फत कर्ज वाटपासंबंधी प्रशासक कुंदन भोळे यांची भेट घेतली असता कोणताही ठोस निर्णय न घेता उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप वांगी विकास सोसायटीचे चेअरमन डॉ. विजय रोकडे यांनी केला आहे.
करमाळा तालुक्यातील सोसायट्या बंद पडण्याच्या मार्गावर
