कारगील विजय दिवसानिमित्त कार्यक्रम : गजेंद्र पोळ यांचा करमाळ्यात विशेष सन्मान

करमाळा (सोलापूर) : कारगील विजय दिवस हा तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादिन ठरावा, असे प्रतिपादन गणेश करे पाटील यांनी केले. करमाळा तालुका आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था व यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने कारगील विजय दिवसानिमित्त कारगील युद्धामध्ये सहभागी सैनिकांनाचा सन्मान करण्यात आला. दरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार गजेंद्र पोळ यांचा विशेष सन्मान झाला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने हुतात्मा जवानांना वंदन, वीर माता, वीर पिता, वीर नारी, हुतात्मा जवान परिवार यांचा सन्मान करण्यात आला. विशेष कामगीरीबद्धल सैनिकांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. ‘मायनस डिग्री तापमानांमध्ये बर्फाचेदित डोंगराळ प्रदेशात राहून भारतीय सैनिक आपल्या सीमेचे रक्षण करत असतो. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. सेनेमध्ये सेवा करण्याची संधी मिळणे हे परमभाग्य असते. या क्षेत्रातील संधीकडे करमाळा तालुक्यातील नवयुवकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत’ करे यांनी व्यक्त केले.

ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. बाबूराव हिरडे म्हणाले, ‘सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याची संधी ज्यांना मिळाली नाही त्यांनी आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये समाजाची गरज ओळखून सेवा केली पाहिजे. सोलापूर जिल्हा आजी माजी संघटनेचे अध्यक्ष अरुण कुमार तळीपाडे म्हणाले, ‘देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सैनिकांची आजही अनेक ठिकाणी उपेक्षा होताना दिसते सैनिकाला सर्वांनी योग्य तो मानसन्मान कायम दिला पाहिजे. माजी सैनिकांना काही अडचणी असतील तर त्यांनी आपणाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.’

कॅप्टन विलास नाईकनवरे म्हणाले, ‘कारगिल युद्धाचा प्रसंग आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असून त्या आठवणी आज आल्या तरी अंगावर रोमांच उभे राहतील या लढाईमध्ये अनेक भारतीय जवान हुतात्मा झाले. आजच्या या दिनानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या पाहिजेत व देश सेवेसाठी त्यागाची भावना कायम मनामध्ये जागृत ठेवली पाहिजे.’ यावेळी शिवाजी भंडारे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यामध्ये सैनिक स्कूलची गरज असून यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.’

सोलापूर जिल्हा आजी माजी संघटनेचे तालुका अध्यक्ष अक्रूर शिंदे, ढेरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका कार्याध्यक्ष अनिल माने, दिगंबर साळुंके, ॲंड. सोनवणे, भिवा वाघमोडे, प्रकाश लावंड उपस्थित होते. कारगिल युद्धामधील कामगिरीबद्दल कॅप्टन विलास नाईक नवरे, कॅप्टन शिवाजी भंडारे, सुभेदार सुरेश आदलींग यांचा सन्मान करण्यात आला. निसर्ग संवर्धन क्षेत्रात पक्षीमित्र कल्याणराव साळूंके, रुग्णवाहिका सेवेबद्दल साजिद शेख, माजी सैनिक कन्या अश्विनी कुंभार यांची कृषी सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल तर सीआरपीएफमध्ये सैनिक म्हणून निवड झाल्याबद्दल यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *