बारावीची परीक्षा देताना करमाळ्यात तीन विद्यार्थ्यांना भोवळ, केंद्रावरच उपचार घेऊन दिला पेपर

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या १२ वीची परीक्षा सुरु आहे. करमाळ्यात विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परीक्षा केंद्र असून या परीक्षेमध्ये सोमवारी (ता. 17) भौतिकशास्त्र व चिटणीसाची कार्यपद्धती या दोन विषयाच्या पेपर सुरु असताना अनिकेत रोडे, श्रावणी वाघमारे व तन्वी पवार या विद्यार्थ्यांना भवळ आली. त्यानंतर केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध करून दिले. परीक्षा देताना विद्यार्थ्याला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून येथे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांना परीक्षेत बसवले व त्यांचे पेपर सुरळीत पार पडले. याबद्दल विद्यार्थी व पालक यांच्याकडून केंद्राचे केंद्र संचालक, उपप्राचार्य यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *