करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासनाकडून जशी तयारी सुरु आहे तशी राजकीय मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात भाजपने निवडणुकीच्या तोंडावर करमाळ्यातील बागल गटाचे नेते मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद दिले ते शेवटच्या बैठकीला! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ३ ऑगस्टला झालेली जिल्हा नियोजन समितीची बैठक ही शेवटची होती. या बैठकीत सदस्यपद देऊन भाजपने नेमके काय साध्य केले आहे? हा खरा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारादम्यान महायुतीचे समनव्यक प्रसाद लाड हे करमाळ्यात आले होते. त्यांनी रक्षाबंधनाला बागल गटाला भेट दिली जाईल, असे सांगितले होते. मग शेवटच्या जिल्हा नियोजन समितीला बागल गटाला सदस्यपद हीच भाजपने भेट दिली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे.

बागल गट निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. गावागावात त्यांचे दौरे सुरु आहेत. दिग्विजय बागल हे स्वतः या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. त्यात जिल्हा नियोजन समितीवर बागल गटाला भाजपने संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यकाल संपत आहे. या पंचवार्षिकमधील शेवटची जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ३ ऑगस्टला झाली.

बागल गटाच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मकाईचे माजी अध्यक्ष बागल यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद देण्यात आले आहे. (या निवडीचे पत्र ‘काय सांगता’ने पाहिलेले नाही.) मात्र त्यांना पद मिळालेले आहे असे गृहीत धरले तरी शेवटच्या सभेत सदस्यपद देऊन बागल गट नेमका कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार हे पहावे लागणार आहे. भाजपला बागल गटाला जिल्हा नियोजन समितीवर घ्यायचे होते तर आधीच का घेतले नव्हते? असा प्रश्न आहे.

बागल गटासाठी करमाळा विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. या निवडणुकीत उतरण्याची तयारी बागल गट करत आहे. नेमके दिग्विजय बागल हे उमेदवार असतील की बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या उमेदवार असतील याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र बागल गटाला भाजपकडून बळ देण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसत आहे. असे असले तरी शेवटच्या जिल्हा नियोजनाला सदस्यपद देऊन भाजपने साध्य काय केले आहे हे पहावे लागणार आहे.

आदिनाथ कारखाना व मकाई कारखान्यामुळे बागल गट अडचणीत आला. मकाईचे ऊस बील थकल्यामुळे बागल गट लोकसभा निवडणुकीत सक्रियपणे प्रचार करू शकत नव्हता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या माध्यमातून मकाईची ऊसबिले देण्यात यश आले. त्यामुळे कृतज्ञता मेळावा बागल गटाने घेतला होता. त्याला भाजपचे आमदार लाड हे उपस्थित होते. तेव्हा रक्षाबंधनाला बागल गटाला भेट देणार असल्याचे सांगितले होते. त्यात आता जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद देऊन भाजपने काय साध्य केले आहे.
कमी- जास्त झालेल्या मतांचा फटका कोणाला बसणार! विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

बागल गटाने थकीत ऊस बील द्यावे यासाठी प्रा. रामदास झोळ यांनी लढा उभा केला होता. आता प्रा. झोळ हे देखील निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत. कामगारांचे व वाहन मालकांचे पैसे देणे बाकी असल्याचा आरोप केला जात आहे. अशा स्थितीत बागल गटाला शेवटच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा कसा फायदा होणार? आणि विरोधक कोणते मुद्दे मांडणार? हे या निवडणुकीत पहावे लागणार आहे. बागल गटाला शेवटच्या ‘डीपीडीसी’ला सदस्यपद देऊन भाजपने नेमके काय साध्य केले आहे? हेही पहावे लागणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *