करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून सोमवारी (ता. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत बारामती ऍग्रोचे अध्यक्ष व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची काय भूमिका असेल याकडे लक्ष लागले आहे.
‘आदिनाथ’च्या निवडणुकीनंतर बदलणार करमाळ्याच्या राजकारणाचे समीकरण!
तालुक्यातील अडचणीत असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना बागल गटाच्या ताब्यात असताना बारामती ऍग्रोला भाडेतत्वार देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यानंतर तांत्रिक अडचण आल्याचे कारण देत यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया झाली. दरम्यान पुणे न्यायालयात बारामती ऍग्रोच्या बाजूने निकाल लागला आणि उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे कारखान्याचा ताबा घेण्यासाठी गेले. मात्र तेथे तत्कालीन माजी आमदार नारायण पाटील यांनी हस्तक्षेप करत ताबा रोखला आणि पुढे न्यायालयीन प्रक्रिया चालली.
महायुती आदिनाथला नवसंजीवनी देऊ शकते; पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावे : चिवटे
त्यानंतर जवळा (ता. जामखेड) येथे एका सभेत आमदार रोहित पवार यांनी जाहीरपणे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तत्कालीन मंत्री तानाजी सावंत व आमदार राम शिंदे यांच्या मदतीने पाटील यांनी राजकारणापोटी या कारखान्याचा ताबा रोखला असा आरोप केला होता. शेतकऱ्यांचे हीत न पहाता फक्त राजकारणासाठी हा ताबा मिळू दिला नाही असे ते म्हणाले होते. त्यानंतर करमाळा तालुक्यातील एका कार्यक्रमात मात्र त्यांनी पाटील यांचे नाव न घेता सावंत यांच्यावर निशाणा साधला होता. आता पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे आमदार पवार नेमकी काय भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे.
आदिनाथ कारखाना सध्या प्रचंड अडचणीत आहे. हा कारखाना सुरु करणे हे आवाहन असून उमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत या कारखान्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. (झरे फाटा येथे लाडकी बहीण योजना कार्यक्रम) मात्र त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. त्यात आता आदिनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार हे काय भूमिका घेतील हे पहावे लागणार आहे. आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर दोनवेळा आमदार पवार हे करमाळ्यात आले. मात्र कारखान्यावर ते बोलले नव्हते. आमदार रोहित पवार यांना याबाबत निवडणूक जाहीर झाल्यापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांनी भूमिका भुमीका मांडलेली नाही.