बिटरगाव वांगी येथे रविवारी होणार दिव्य गुरुपौर्णिमा उत्सव

करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या महाराष्ट्रातील संतांच्या दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. त्यात करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे श्री संत रघुराज महाराजांच्या भेटीला गुरुपौर्णिमे दिवशी साक्षात पांडुरंग परमात्मा येतात व द्वारकेवरचा काला संपन्न करतात, अशी आख्यायिका सांगितली जात आहे. म्हणून श्री संत रघुराज महाराजांचे नववी वंशज हभप रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा कार्यक्रम रविवारी (ता. 21) होणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *