शासकीय वसतिगृहासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन

सेालापूर : शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु असून जिल्ह्यातील शासकीय वस्तीगृहांमध्ये निशुल्क प्रवेशाची अंतिम तारीख – अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा निकाल लागल्यापासुन पुढील 15 दिवस, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला- मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहे ही योजना राबविली जाते. सदर योजनेंतर्गत जिल्ह्यात एकुण 16 शासकीय वसतिगृहे असून त्यामध्ये मुलांसाठी 9 व मुलीसाठी 7 शासकीय वसतिगृहांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या तसेच दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज वातावरणात उत्तम शिक्षण देऊन त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील करणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. प्रवेश कोणासाठी आहे- इयत्ता 8वी पासून ते उच्च/व्यावसायिक शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छणारे विद्यार्थी.

प्रवेशित विद्यार्थ्यांना निशुल्क पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा- शैक्षणिक इयत्तेनुसार क्रमिक पाठ्यपुस्तके व आवश्यक स्टेशनरी, स्पर्धा परीक्षा (CET, NEET, MPSC, UPSC, इत्यादी) तयारीसाठी संदर्भ पुस्तके, वातानुकूलित संगणक कक्ष, ई-लायब्ररी, अभ्यासिका, व अंतर्गत जिम, भोजन व शुद्ध पिण्याचे पाणी, CCTV कॅमे-यांसह 24 तास सुरक्षा तसेच 24 तास सुरक्षारक्षकांची उपस्थिती, प्रशस्त स्वच्छ निवासगृहे, क्रीडा साहित्य, व मैत्रीपूर्ण अल्हाददायक शैक्षणिक वातावरण.

निर्वाहभत्ता : तालुका स्तरावर 500 रुपये/महिना आणि जिल्हा स्तरावर 600 रुपये (मुलींसाठी रु. 100/-ज्यादा) जिल्ह्यातील वसतिगृहाचे ठिकाणे- मुलांसाठी (9 वसतिगृह): सोलापूर व बार्शी प्रत्येकी 2 वसतिगृह, अक्कलकोट, पंढरपूर, माढा, अकलूज, करमाळा प्रत्येकी 1 वसतिगृह. मुलींसाठी (7 वसतिगृह): सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, कुडूवाडी, माळशिरस.

अर्ज करण्याची प्रक्रिया : अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा निकाल लागल्यापासून पुढील 15 दिवस संपर्क : http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर (दुरध्वनी क्र. 0217-2734950) या क्रमांकावर संपर्क साधावा.

एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य : ‘एखाद्या विद्यार्थ्यांचे जीवन बदलण्यासाठी फक्त एक संदेश पुरेसा आहे! ही माहिती आपल्या परिसरातील गरजवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व सामाजिक कार्यकत्यांपर्यंत पोहोचवा. विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ मिळवून देण्यात आपणही सहभागी व्हा!’ असे सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *