Contaminated water in Karmala city

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नगरपालिकेच्या कामकाजाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात असून या प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे म्हणाले, करमाळा नगरपालिकेच्या नळाला चार दिवसांनी पाणी सुटते. ते पाणी सुटल्यानंतर दूषित पाणी येत आहे. नागरिकांना दूषित पाणी घ्यावे लागत असून जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करावी, दुरुस्त न केल्यास करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना मंगळवारी (ता. २) हेच घाण पाणी देणार असल्याचा इशारा दिला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *