सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 6 ते 20 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/03/Ajinkya-Patil-1024x494.jpg)
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
![Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Kemkar-I-Cair-1024x738.jpg)
हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलिस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, दुय्यम पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Dhale-3-1024x613.jpg)