कमलाभवानी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याप्रमाणे कमलाभवानी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता देणार’ असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी जाहीर केले आहे. कमलाभवानी साखर कारखान्याचा नववा गाळप हंगाम प्रारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून आज (मंगळवार) झाला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. मोळी पूजन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामन उबाळे यांच्या हस्ते झाले.

जिल्हा परिषदचे माजी सदस्य चंद्रकांत सरडे, माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भरत अवताडे, मानसिंग खंडागळे, मांगी विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सुजित बागल, विनय ननवरे आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘सरकारचा एमएसपी संदर्भात योग्य निर्णय झाल्यास प्रत्येक कारखान्याला चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांना दर देता येईल. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याप्रमाणे आपण पहिला हप्ता शेतकऱ्यांना देणार आहे.’

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उबाळे म्हणाले, ‘यावर्षी आम्ही शेतकऱ्याचे पैसे वेळेत देणार आहोत. कमलाभवानी साखर कारखाना पुढील काळामध्ये प्रगतीपथावर जाऊन विकासाच्या योग्य मार्गावर जाईल. आम्ही लवकरात लवकर साखर विकून शेतकऱ्यांचे पैसे देणार’ असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप यांनी प्रस्ताविक केले केले. बागल, सरडे व बारकुंड यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

अशपाक जमादार, अनिल केकान, अजित केकान, सागर काळे,अभिमान अवचर, शामराव गव्हाणे, सिद्धेश्वर सोरटे, समाधान भोगे, तात्या सरडे, नारायण नांगरे, बाप्पा चव्हाण आदी उपस्थित होते. कारखान्याचे जनरल मॅनेजर अरविंद चौधरी, डेप्युटी जनरल मॅनेजर रामचंद्र क्षीरसागर, चीफ फायनान्स मॅनेजर आनंदराव उबाळे, वर्क्स मॅनेजर समाधान गायकवाड, चिफ केमिस्ट विनोद जाधव, मुख्य शेती अधिकारी जगदाळे, ऊस पुरवठा अधिकारी सुजित शिंदे, सिव्हिल इंजिनिअर कमलाकर टोणपे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *