‘३५ जणांचा जीव वाचविणाऱ्या देवदुताचा सरकारने सन्मान करावा’

मुंबईतील गेट ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीअपघात प्रकरणात १३ जणांचा मृत्यू बुडून झाला. त्यामध्ये तीन नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातातुन 101 लोकांचा जीव वाचवण्यात आला आहे. अपघात घडला त्यावेळी काही मिनिटांतच आस- पासच्या बोटी मदतीसाठी आल्या. त्यामुळे अनेकांचा जीव वाचवणे शक्य झाले.

वेळेत मदत मिळाली नसती तर कदाचित मृतांचा आकडा वाढला असता. अशा वेळी बचाव दल पोहचले सुद्धा नव्हते अशा वेळी देवदुत म्हणून पहिल्या अर्ध्या तासात आरीफ मोहंमद बामणे नावाच्या पायलट बोटीवरील एका व्यक्तीने तब्बल ३५ जणांचा जीव वाचविला आहे. १८ वर्षे या क्षेत्रात ते काम करत आहेत. त्यांनी प्रवाशांना वाचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाच्याविरुद्ध दिशेला आपली बोट थांबविली होती. त्याचवेळी उलटलेल्या बोटीतून अशा प्रवासी वाहुन त्या दिशेने येत होते. अशा धाडसी कार्य करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रपती पदकाने गौरव करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरीफ मोहंमद बामणे याचा गौरव करावा, अशी मागणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *