करमाळा (सोलापूर) : वीटसह तालूक्याच्या उत्तर भागातील गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असुन नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार नारायण पाटील यांनी केले.
कुकडीचे पावसाळी आवर्तन सुरु सुन वीट येथील तलाव व बंधारे भरल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी पुजन कार्यक्रम झाला. आमदार पाटील म्हणाले, ‘करमाळा तालुक्याचा उत्तर भाग सिंचनापासुन वंचित आहे. या भागात मांगी तलावाही आहे. याशिवाय इतर तलाव व बंधारे आहेत. परंतु साठवण करण्यासाठी पाणी नाही. कुकडीचे पाणी टेल मायनरला असल्याने अनेक अडचणी येतात. रिटेवाडी उपसा सिंचन योजना आपण सरकार दरबारी मांडली. यांचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली असुन ही योजना कायमस्वरूपी कार्यान्वित होण्यासाठी आपण प्रयतन करत आहोत.
बिभीषण आवटे, सुभाष जाधव, सुनील ढेरे, श्रीरंग जाधव, आदिनाथ संचालक देवानंद बागल, राजेद्रसिंह राजेभोसले, तात्यासाहेब जाधव, डिगांबर गाडे, बाळासाहेब गाडे, संतोष ढेरे, केशव चोपडे, डॉ. ढेरे, अशोक राऊत, बिभीषण ढेरे, नवनाथ जाधव, हनुमंत ढेरे, बाबासाहेब ढेरे, रघुनाथ ढेरे, सतीश निंबाळकर, धोडींबा जाधव, प्रकाश ढेरे, धनसिंग भोंग, कृष्णा ढेरे, गणेश ढेरे, गणेश जाधव, जगदिश निंबाळकर, अंकुश जाधव, भाऊ गाडे, आण्णा जाधव, सुनिल टेलर, धनसिंग जाधव, भाऊ ढेरे, नवनाथ कोळी, अतिनाथ पवार आदी उपस्थित होते.