करमाळा : मकाई निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला असून यामध्ये बागलविरोधी गटाला दिलासा मिळाला आहे. रिटर्निंग ऑफिसर (निवडणूक निर्णय अधिकारी) यांच्या समोर शुक्रवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता उपस्थित राहून अपील केलेल्या उमेदवारांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संबंधित रिटर्निंग ऑफिसरने सुधारित आदेश पारित करावेत, असेही आदेश दिले आहेत. त्या सुधारित आदेशानुसार पुढची कार्यवाही करावी, असे सांगितले आहे. त्याचबरोबर जर आम्हाला रिटर्निंग ऑफिसरचे म्हणणे मान्य नसेल तर पुढील प्रक्रियेसाठी आम्हाला पुन्हा संधी उच्च न्यायालयाने दिलेली आहे, असे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.
![Breaking There will be a rehearing in Karmala on the application disqualified in the Makai election](https://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/06/Makai-Election-1.jpg)