Disruption of water supply in the fort sectionDisruption of water supply in the fort section

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सुरळीत पाणी मिळावे, अशी मागणी नागिकांनी केली आहे. याबाबत करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्यावर २४ नागरिकांच्या सह्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, किल्ला विभागात दोन महिन्यापासून सुरळीत पाणी मिळत नाही. बुरुज लाईन परिसर येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधूनही प्रश्न मार्गी लागत नाही. पंपींगसाठी वीज मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. पाणी पुरवठावेळी वीज गेल्यानंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. यामुळे संपूर्ण परिसर त्रस्त झाला आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर शेखर जोगळेकर, प्रा. मंगेश तरकसे, अनिल कलढोणे, दादा गाडे, रेश्मा गाडे, कांतीलाल टके, जी. जे. सावंत, ज्ञानेश्वर पटुळे, सुषमा शिंदे, दर्शन चंकेश्वर, नारायण जोशी, अविनाश जोशी, सागर गायकवाड, सूरज मिसाळ, प्रमोद जाधव, नानासाहेब शिंदे, आशिष अडसूळ, समीर खान, शिवाजी जगताप, प्रशांत जगताप, अक्षय घुमरे, जयंत दळवी, लालसाहेब कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *