Jubilation in Karmala after the successful landing of Chandrayaan 3

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वी झाली आहे. ‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केले आहे. यामुळे चंद्राच्या या भागात उतरणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. इस्रोच्या या यशावर करमाळ्यात भाजी मंडई परिसरात भाजपकडून एकमेकाला पेढे भरवत जल्लोष केला. बुधवारी २३ तारखेला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगीता नष्टे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, देविदास नष्टे, केदार राजमाने, चंद्रशेखर राजमाने, मीनाक्षी गुंजेगावकर, सावताहरी कांबळे, दादा लांडगे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *