करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारी कार्यकाळ संपल्यामुळे बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच नवीन कार्यकारी जाहीर केली जाईल, असे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Screenshot_2024_0424_185822.png)
जिल्हा कार्याध्यक्ष गोडगे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना कायम शेतकऱ्यांसाठी लढत आहे. नवीन व जुन्या पदाधिकाऱ्यांची सांगड घालून हा लढा कायम सुरु राहणार आहे. सध्याच्या कार्यकारिणीचा कालावधी संपलेला असून ही निवड बरखास्त करण्यात येत आहे. थोड्याच दिवसात नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असे गोडगे म्हणाले.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Matosrhi-2-2-1024x606.jpg)
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Kemkar-I-Cair-2-1024x738.jpg)