पुणे : अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन एएमसीसीआईईचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील नवीन बदलांचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून एमएसएमई क्षेत्राच्या पेमेंट नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/dhale-1024x614.jpeg)
अग्रवाल म्हणाले, एमएसएमईंना काही दिवसात पेमेंट मिळेल. जर एखादी कंपनी 45 दिवसांच्या आत पुरवठा केलेल्या वस्तू किंवा सेवांसाठी पैसे भरण्यात अयशस्वी झाली, तर ती रक्कम तिचे उत्पन्न म्हणून गणली जाईल आणि तिला कर भरावा लागेल. सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना अग्रवाल म्हणाले, नवीन नियमामुळे एमएसएमईंना मोठा फायदा होईल. यामुळे त्यांची रोखीची कमतरता दूर होईल. एएमसीसीआईईचे उपाध्यक्ष नरेंद्र गोयल आणि कमलराज बन्सल, विनोद सांकला व अन्य सर्व पदाधिकारी यांनीही असेच मत व्यक्त केले आणि ते म्हणाले की, नवीन नियमांनुसार, एखाद्या मोठ्या कंपनीने लेखी करारानुसार 45 दिवसांच्या आत एमएसएमईला पैसे दिले नाहीत, तर ती रक्कम तिच्या उत्पन्नात खर्च म्हणून दाखवू शकणार नाही.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/03/Ajinkya-Patil-1024x494.jpg)
![Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Kemkar-I-Cair-1024x738.jpg)