करमाळा (सोलापूर) : भीमा- सीना जोडकालवा परिसरातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करा, अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या पिकांची सद्यस्थिती याचा प्रशासनाने विचार करावा. भीमा- सीना बोगदा तसेच सीना नदीच्या दोन्हीकडील शेती पंपाच्या वीज पुरवठा प्रशासनाने कपात केला आहे. याचा परिणाम शेतातील पिकांवर होत आहे. उजनीतून सीनेचे सोडलेले आवर्तन पुर्ण होईपर्यंत या परिसरातील शेती पंपाच्या वीज पुरवठ्यात खंड पाडला आहे.’
‘कंदर, सातोली, केम, दहिवली, उपळवटे, ढवळस, बारलोणी, महादेववाडी, गवळेवाडी, पिंपरी व कव्हे परिसरात बोगदा व नदी काठच्या उभ्या पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यांना वेळीच पाणी मिळाले नाही तर वाया जातील. त्यामुळे या भागातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करावा’, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.