करमाळा (सोलापूर) : ग्रामीण भागातून ये- जा करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वेळेवर बस सेवा सुरू करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा सेना शहर उप्रमुख आदित्य जाधव यांनी दिला आहे. खेडेगावातून दररोज शाळेकरीता अनेक विद्यार्थी ये- जा करत असतात. सदर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वेळोवेळी बस उपलब्ध होत नसल्याने त्यांना वेळेवर शाळा कॉलेजेसला पोहोचता येत नाही. तरी आपणास विनंती आहे की, दिलेल्या वेळेनुसार गाड्या उपलब्ध व्हाव्यात व ज्या गावांकरिता एसटी बस वेळेवर नाही. त्या गावातून करमाळ्याकडे येणाऱ्या बसेसची सोय वेळेवर करण्यात यावी, अशी मागणी युवासेना शहर उपप्रमुख आदित्य जाधव यांनी केली. याबाबत त्यांनी आगरप्रमुख यांना निवेदन दिले आहे.
