टंचाई लक्षात घेऊन म्हसेवाडी तलावातील पाणी उपसा थांबवा

Stop pumping water from Mhesevadi lake keeping in mind the scarcity

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडे येथील म्हसेवाडी तलावातून पाण्याचा बेसुमार उपसा सुरु आहे टंचाई परस्थिती लक्षात घेऊन हा पाणी उपसा बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर्षी पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाईला समोर जाण्याची वेळ आली आहे. तलाव आटल्याने गावाचा पाणी पुरवठा योजनाचे पाणी आठवड्यातून एकदा सुरु आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हसेवाडी तलावात दहीगाव उपसा सिंचन योजनाचे पाणी सोडले. त्यामुळे या तलावात जेम- तेम साठा झाला आहे. जनावरांना व ग्रामस्थांना पिण्यासाठी काही दिवस का होईना हा पाणी पुरवठा योजना सुरु राहून राहण्यासाठी मदत होणार आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे तरीही या तलावतील मोटारी टाकुन बेसुमार पाणी उपसा सुरू आहे. हा पाणी उपसा त्वरीत बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *