स्वातंत्र्य दिनानिमित्त करमाळा शहरातील मेन रोडवर विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली

Tiranga rally of students on the main road of Karmala city on the occasion of Independence Day

करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या वतीने करमाळा शहरातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानांतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या निमित्ताने आज (सोमवारी) विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत भव्य रॅली काढली. आझादी का अमृत महोत्सव अभियानांतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये सकाळी ८.१५ वा. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी घोषणा देत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य लेफ्ट. संभाजी किर्दाक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *