करमाळा (सोलापूर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने गाळप ऊसाचे बील अद्याप दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला असून हे बिल तात्काळ देण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रा. रामदास झोळ, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश वाळुंजकर यांच्या सह्या आहेत. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना त्यांनी हे निवेदन दिले आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे या गाळप हंगामातील बील थकले आहे. सध्या कारखाना बंद झाला असून साखर, मॉलिसीसची विक्री प्रक्रिया सुरु असून त्यातून येणारे पैसे शेतकऱ्यांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/01/Dhale-3-1024x613.jpg)
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/01/Kemkar-I-Cair-2-1024x738.jpg)