करमाळा (सोलापूर) : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुरांचे उत्पन्न जास्तीचे आहे. शेतीसाठी लागणारी मशागत, मजूरी, खते, बी- बीयाणे, औषधांची झालेली महागाईमुळे शेती करणे तोट्याचे बनले आहे. शासकीय सर्व्हंनुसार राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. याला जबाबदार चुकीचे शेती धोरण व सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन अयोग लागू होणे गरजेचे आहे. निवडणुकपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आले की, शेतकऱ्यांचा उतारा कोरा करणार म्हटले होते. त्यांचे काय झाले? आत्ता मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीचा विसर पडलाय का? यांना सत्तेची मस्ती चढली आसल्याचा अरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी निवेदनाद्वारे केला आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी करमाळा निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे यांना दिले आहे. यावेळी बाळासाहेब टकले, जगन्नाथ सलगर, नामदेव पालवे, शिवाजी खटके, विकास मेरगळ, सुधीर ठोंबरे, सुनील बंडगर, रघुनाथ खटके, यशवंत सलगर, शंकर सुळ, दीपक कडू उपस्थित होते.
कर्जमाफी व अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी?
