करमाळा (सोलापूर) : कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळा तालुक्यालाच मिळणार आहे, असे प्रा. शिवाजी बंडगर यांनी सांगितले आहे.

कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेस राज्य सरकारने 3326 कोटी मंजूर केले. त्यामुळे सहा जिल्हे आणि 32 तालुक्यातील साडेपाच लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला होणार आहे. विशेषता हे पाणी कृष्णा खोर्‍यातून उजनी धरणात येवून पुढे सिना कोळगाव धरण मार्गाने मराठवाड्यात जाणार असल्याने करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याने धरणासाठी सर्वस्व त्यागणार्या उजनी व कोळगाव धरणग्रस्तासह संपूर्ण करमाळा तालुक्यालाच आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी बंडगर यांनी अकलुज येथे शिवरत्न बंगल्यावर बोलताना केले.

कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेस सरकारने निधी मंजूर केल्यानंतर या योजनेचे जनक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करमाळा तालुक्याच्या वतीने शिवरत्न बंगला, अकलुज येथे करण्यात आला. या वेळी प्रा. बंडगर बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविताराजे भोसले, दिलीप तळेकर, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उदयसिंह मोरे पाटील, माजी संचालक संतोष खाटमोडे पाटील, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, माणिकराव साखरे, शिवशंकर माने, महेंद्र पाटील, सरडे बापू, औदुंबर भोसले, अमरजीत साळुंके, महारूद्र पाटील, हनुमंत पाटील, आबा टापरे, चैतन्य पाठक, गणेश घोरपडे, बाळासाहेब महानवर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की, या योजनेस काहीनी विरोध करत खिल्ली उडवली होती . परंतु विजयसिंह मोहिते पाटील यानी आपली राजकीय ताकद पणाला लावली. सतत याचा पाठपुरावा चालूच ठेवला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साडेआठ लोकांच्या सहीचे निवेदन त्याना दिले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही या योजनेचा ध्यास घेतला होता. या सर्वांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सकारात्मक प्रतिसाद दिला. अपुर्या पावसामुळे उजनी तसेच कोळगाव धरण अनेकदा भरली जात नाहीत. त्यावेळी शेकडो एकर शेती धोक्यात येते. वीज कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागते. कृष्णा खोर्‍यातील वाया जाणारे पाणी उजनी आणि कोळगाव धरणात येणार असल्याने ही समस्या निर्माण होणार नाही. रिटेवाडी उपसासिंचन सारखी योजना ही होवू शकते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार आहे.

माजी उपमुख्य मंत्री विजयसिंह मोहिते पाटील याना कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेचे श्रेय मिळु नये म्हणून काहीनी या योजनेस खूप विरोध केला. पण विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यानी याचा अविरत पाठपुरावा केला आणि निधी मंजूर झाला. करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. सूर्य चंद्र असे पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच नाव या निमित्ताने आता घेतले जाईल, असे शहाजीराव देशमुख,
यांनी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *