भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वी झाली आहे. ‘चांद्रयान-3’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केले आहे. यामुळे चंद्राच्या या भागात उतरणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. इस्रोच्या या यशावर करमाळ्यात भाजी मंडई परिसरात भाजपकडून एकमेकाला पेढे भरवत जल्लोष केला. बुधवारी २३ तारखेला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगीता नष्टे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, देविदास नष्टे, केदार राजमाने, चंद्रशेखर राजमाने, मीनाक्षी गुंजेगावकर, सावताहरी कांबळे, दादा लांडगे आदी उपस्थित होते.
चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर करमाळ्यात जल्लोष
