करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील संगम चौक ते भवानी नाका दरम्यान रस्त्यावर मोठ- मोठाले खड्डे पडले आहेत. येथून जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनामुळे जलवाहिनी फुटत असून त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. रस्त्यावरील दूषित पाणी जलवाहिनीत जात असून नागरिकांना घाण पाणी प्यावे लागत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर नवनाथ खरात, अजय निर्गुणकर, गणेश गोणेकर, वैभव कांबळे, संजय फुटाणे, सोमनाथ क्षीरसागर आदींच्या सह्या आहेत.
