करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, रासप, रयत क्रांती व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Matosrhi-2-1024x606.jpg)
भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, युवा मोर्चाचे शंभूराजे जगताप, महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अजय बागल, आरपीआयचे अर्जुनराव गाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
![Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Kemkar-I-Cair-1024x738.jpg)
यावेळी राजकुमार पाटील, बबनराव मुरूमकर, सचिन शिंदे, महेश साठे, भरत आवताडे, कन्हैयालाल देवी, जयकुमार शिंदे, सुजित बागल, भगवानगिरी गोसावी, दिनेश भांडवलकर, प्रवीण जाधव, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, जगदीश अग्रवाल, काकासाहेब सरडे, उमेश पाटील, मोहन डांगरे, नितीन झिंजाडे, अंगद देवकते, संजय शिलवंत, सुहास घोलप, दीपक चव्हाण, अभिषेक आव्हाड, राहुल कानगुडे, ओंकार बसवंती, संतोष वारगड, ज्योती शिंदे, पूजा माने आदी उपस्थित होते.