करमाळा : तालुक्यात ऍट्रॉसिटीअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करा, या मागणीसाठी आंदोलन केले जाईल, असा इशारा आरपीआय (आ) युवकचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी दिला आहे. निवेदनाद्वारे त्यांनी हा इशारा दिला आहे. २० दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही संशयित आरोपी अटकेत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. संशयित आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी (ता. 28) दुपारी 12:30 वाजता गायकवाड चौक ते तहसील कचेरीवर ‘जवाब दो’आंदोलन केले जाणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *